सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर येथे गुरुवार दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य प्रो.(डॉ.) अनिल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विश्वस्त मंडळ, कार्यकारी समितीचे पदाधिकारी व सदस्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी समितीचे अध्यक्ष मा. बाळा पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी मा. मिलिंद शिंदे, मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट संकायचे अधिष्ठाता प्राचार्य प्रो. (डॉ.) आर. पी. बांबर्डेकर तसेच ज्ञानवर्धिनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मा. किशोर कुडव उपस्थित होते. यावेळी ज्ञानवर्धिनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष श्री. देवेंद्र शहा, कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर अधिकारी, विश्वस्त मंडळाचे सचिव श्री. रमेश वनारसे, कार्यकारी समितीचे सचिव श्री. दिलीप भोपराव, विश्वस्त मंडळाचे सहसचिव श्री. राजेंद्र भोपतराव, कार्यकारी समितीचे सहसचिव श्री.वैभव जगे, विश्वस्त मंडळाचे खजिनदार श्री. गजानन पाटील, कार्यकारी समितीचे खजिनदार श्री.यशवंत गुजरे, विश्वस्त मंडळाचे सदस्य श्री. पंकज शहा, कार्यकारी समितीचे सदस्य श्री. सोमनाथ काबाडी, श्री. बाळासाहेब खारीक, श्री. नरेश अधिकारी, श्री. सतीश पातकर, श्री. दीपक बजाज, श्री. अनिल निचिते, श्री. अरुण कासार, श्री. प्रशांत फुले, श्री. संदीप महाजन, श्री. नितीन अग्रवाल, श्री. कल्पेश दुधाळे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत प्रस्तुत करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) अनिल सिंह यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात प्रामाणिकपणा, मेहनत आणि शिस्त या मूल्यांच्या आधारे यश संपादन करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना व्यासपीठावर आमंत्रित करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांचा अभिमान यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सीमा परटोले यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले तर डॉ. अश्विनी ओव्हाळ यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचालन केले. हा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रगीत गाऊन यशस्वीरित्या संपन्न झाला.















